
-राहुल लव्हाळे
सातारा: गणेशोत्सव म्हणजे भक्तिभाव, उत्साह आणि एकतेचा सण. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा घरोघरी, मंडपामध्ये गणरायाचे आगमन होते, तेव्हा संपूर्ण वातावरण मंगलमय होते. अशा गणरायांचे आगमन उद्या (बुधवारी) होत आहे; पण मे महिन्यापासून सुरू झालेला अवकाळी पाऊस, निर्माण होत असलेली पूरस्थिती आणि शेतीवाडीचे झालेले नुकसान यासह अनेक संकटांची मालिका सहन करणाऱ्यांची विघ्ने दूर करण्याच्या पावलांनीच आता तू ये, अशी आर्त सादही जिल्ह्यातून घातली जाईल.