

Krishna River at Risk: Untreated Sewage Released by 20 Villages in Karad Taluka”
Sakal
-सचिन शिंदे
कऱ्हाड : तालुक्यातील वीसहून अधिक गावांतील सांडपाणी थेट कृष्णा नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे कृष्णाकाठच्या गावांना पाणी प्रदूषणाचा धोका आहे. कऱ्हाड शहरात काही प्रमाणात सांडपाण्यावर प्रक्रिया होते. मात्र, ग्रामीण भागात उपाययोजनाअभावी गावांना धोका आहे. त्याबाबत पंचायत समितीने केलेल्या सर्व्हेत धोक्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. या सर्व्हेतही १९ गावे समोर आली आहेत. त्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या व सांडपाणी प्रकल्प राबविण्याच्या नोटिसाही संबंधित गावांना पंचायत समितीने दिल्या आहेत.