Gram Vikas Minister Jaykumar Gore addressing a BJP campaign meeting at Siddheshwar Kuroli.
Sakal
सातारा
Jaykumar Gore:औंधसह २१ गावांना तीन वर्षांत पाणी देणार: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे; यापुढची निवडणूक पाणीप्रश्नावर होणार नाही!
Gram Vikas Minister Jaykumar Gore Development promise: औंधसह २१ गावांना तीन वर्षांत पाणी योजना पूर्ण करण्याचा मंत्री गोरे यांचा निर्धार
औंध : केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांनी जनतेच्या जीवनात स्थिरता आणली आहे. आज गावोगावी विकासाचे मोठे पर्व उभे राहिले आहे. माण-खटाव मतदारसंघात आमूलाग्र कायापालट होत आहे. पाणी योजनांची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. आता औंधसह २१ गावांच्या योजनेची मान्यता होऊन तीन वर्षांत या योजनेचे पाणी देणार, असा शब्द ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला.

