सातारा : माण तालुका अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत

तालुक्यातील दहा तलावात एकूण पाणीसाठ्याच्या केवळ वीस टक्केच पाणीसाठा सध्या उरलाय
weather update maan awaiting for rain Ten ponds store only twenty percent total water satara
weather update maan awaiting for rain Ten ponds store only twenty percent total water satara sakal

गोंदवले : जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागातील पाणीसाठे भरून वाहण्याच्या मार्गावर आहेत. परंतु माणमध्ये अजूनही मोठा पाऊस न झाल्याने पाणीसाठे तळ गाठू लागलेत. आठवडाभरापूर्वी अत्यल्प पाणीसाठा उरलेल्या आंधळी व राणंद तलावात सध्या उपयुक्त पाण्याचा ठणठणाट झाला आहे. तालुक्यातील दहा तलावात एकूण पाणीसाठ्याच्या केवळ वीस टक्केच पाणीसाठा सध्या उरलाय.त्यामुळे आता लोक मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. माण तालुक्यात पावसाचा लहरीपणा हा दुष्काळी परिस्थितीसाठी कारणीभूत ठरत आलाय. गेल्या काही वर्षांपूर्वी पाण्यासाठी टँकर तर जनावरांसाठी छावणीचा आधार घ्यावा लागत होता. परंतु गेल्या अलीकडच्या काळात मात्र पुरेशा पावसाला जलसंधारणाची साथ मिळालीच, शिवाय उरमोडी प्रकल्पाचे पाणीही खळखळून वाहू लागल्याने ही परिस्थिती बदलून गेली.

गेल्या दोन -तीन वर्षात चांगला पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्वत्र पाणीसाठे ओव्हरफ्लो झाले.त्यामुळे दुष्काळाच्या धगीपासून लोकांची सुटका झाली.याशिवाय काही भागाला अवकाळी झालेल्या पावसाने नुकसानीचा फटकाही सोसावा लागला.दुष्काळावर मात करण्यासाठी गावोगावी झालेल्या जलसंधारण कामामुळे पावसाचे पाणी त्या त्या भागात थांबून राहिल्याचे चित्र आता दिसत आहे. गेल्यावर्षी पावसाने व उरमोडीच्या पाण्याने तालुक्यातील सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहिले. परंतु पाण्याचा उपसाही वाढल्याने हा पाणीसाठा लवकर खालावला.तालुक्यात सध्या कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असला तरी तालुक्यातील आंधळीसह राणंद,लोधवडे,गंगोती, मासाळवाडी व महाबळेश्वरवाडी हे तलाव कोरडे पडले आहेत. तर पिंगळी,जांभूळणी,जाशी व ढाकणी तलावात कमी पाणीसाठा उरला आहे.

गेल्या आठवड्यात आंधळीमध्ये ०.७८ दशलक्ष घनमीटर तर राणंद तलावात २.१९दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उरला होता.सध्या तुलनेत जाशी तलावात सर्वाधिक म्हणजे ३४ टक्के पाणीसाठा आहे.तर त्या खालोखाल ढाकणी २१.८०, जांभुळणी १५.०४ व पिंगळी ११.८६ टक्के वापरयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.यंदा आधाप पावसाचा जोर नसल्याने तालुक्यातील दहा पैकी सहा तलावात उपयुक्त पाण्याची पातळी शून्य टक्के आहे.आगामी काळात जोरदार पाऊस झाल्यास सर्व तलाव भरून वाहण्याची शक्यता आहे.शिवाय माण नदी देखील भरून वाहण्याची आशा व्यक्त होत आहे. तालुक्यातील दहा तलावांची एकूण पाणीसाठवण क्षमता ३५.३५ दशलक्ष घनमीटर असून एकूण उपयुक्त पाणीसाठा २९.८७ दशलक्ष घनमीटर आहे.त्यापैकी केवळ २.२८ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा सध्या शिल्लक आहे.

पाणीसाठ्यांची सद्यस्थिती : कंसात एकूण उपयुक्त पाणीसाठा (सर्व आकडे दशलक्ष घनमीटर मध्ये) राणंद- (६.४२) मृतसाठा, पिंगळी- (२.३६) ०.२८,आंधळी- (७.४३) मृतसाठा, लोधवडे -(०.७०) मृतसाठा,जांभूळणी- (२.२६) ०.३४,गंगोती- (१.३६) मृतसाठा, महाबळेश्वरवाडी- (१.५०) मृतसाठा, ढाकणी- (२.६६) ०.५८,मासाळवाडी- (२.०२) मृतसाठा,जाशी- (३.१६) १.०८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com