Primary school teachers presenting self-composed social awareness ovis under the ‘Navbharat Saksharta’ initiative in Jawali.
Sakal
सातारा
New India Literacy: समाजप्रबोधनपर ओव्यांतून ‘नवभारत साक्षरता’; प्राथमिक शिक्षिकांकडून निर्मिती; जिल्हा परिषदेसह जावळी पंचायत समितीचा उपक्रम
Folk Verses with a Message:आलेवाडी शाळेच्या प्रियांका श्रीराम किरवे, मेढा शाळेच्या योगिता राजेश मापारी, मेढा शाळेच्या शिल्पा बाळासाहेब फरांदे, बिरामणेवाडी शाळेच्या अंजली शशिकांत गोडसे या प्राथमिक शिक्षिकांनी असाक्षरांच्या मनातील भावभावनांचे वर्णन ओव्यांतून केले आहे.
-संदीप गाडवे
केळघर: नवभारत साक्षरता अभियानाचा प्रचार व प्रसार अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती जावळी व सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये तालुक्यातील चार प्राथमिक शिक्षिकांनी समाजप्रबोधनपर ओव्यांची निर्मिती केली. यातून अभियानात लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला असून, तो यशस्वी ठरला आहे.