भारतात सुरू होणार 5G ट्रायल, लवकरच फोनवर वापरणे शक्य

5G मोबाइल नेटवर्कपासून भारत आता फक्त एक पाऊल दूर आहे.
5G
5G

5G मोबाइल नेटवर्कपासून भारत आता फक्त एक पाऊल दूर आहे. भारत सरकारच्या रत सरकार के डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्यूनिकेशन्स (Department of Telecommunications) और मिनिस्ट्री ऑफ कम्यूनिकेशन (Ministry of Communications) ने 5G चाचण्यांना मान्यता दिली आहे. ज्यांना 5G स्पेक्ट्रम देण्यात आले आहे त्यांनाच ही परवानगी देण्यात आली आहे. या आठवड्यापासून कंपन्या ही चाचणी सुरू करणार असल्याचे वृत्त आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ (Reliance Jio), भारती एअरटेल(Bharti Airtel), व्हीआय (Vi) भारत मध्ये आपली चाचणी सुरू करणार आहेत. ,ही चाचणी किती काळ टिकेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चीनी व्हेडंर या चाचणीपासून दूर राहतील, म्हणजेच हुआवेई ही कंपनी या 5G चाचणीचा भाग असणार नाही. ही घोषणा अशा वेळी झाली जेव्हा भारताने 5G रोलआऊटवर थोडी पकड निर्माण केली आहे. जरी 5G वरील हालचाली काही महिन्यांपासून भारतात दिसून आल्या, परंतु त्याच्या अधिकृत घोषणा आणि 5G चाचण्यांसाठी. स्पेक्ट्रम वाटपाच्या प्रतीक्षेत सगळे आहेत. (5g trials set to begin in india and you could be using 5g on your phone)

JIO स्वदेशी 5 जी नेटवर्क विकसित करतेय

रिलायन्स जिओने यापूर्वीच सांगीतले आहे की ते एक स्वदेशी 5G नेटवर्क विकसित करतील. कंपनी यासाठी स्वत: चे मॅसिव एमआयएमओ आणि 5G जी लहान सेल उपकरणे बनवण्यावरही काम करत आहे. भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत अंतर्गत जिओ हे पूर्णपणे मेड इन इंडिया बनवित आहे.

एअरटेलने हैदराबादमध्ये चाचणी घेतली

जानेवारीत भारती एअरटेलने हैदराबादमधील कमर्शियल नेटवर्कवरील यशस्वी 5G चाचणीची घेतली आणि ते म्हणाले की त्यांचे सॉफ्टवेअर 5G तयार आहे आणि फक्त सॉफ्टवेअर अपडेट सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे.

5G
iPhone 11 वर मिळतेय जबरदस्त ऑफर, अगदी कमी किंमतीत करा खरेदी

या मेगाहेर्ट्झवर चाचणी घेतली जाऊ शकते

भारतात 5G मोबाइल नेटवर्क चाचण्यांसाठी कोणते बॅन्ड तैनात केले जातील हे पाहणे बाकी आहे. आणि लवकरच टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी व्यावसायिकरित्या रोलआउट होण्याच्या स्थितीत असतील. भारतातील 5G नेटवर्कमध्ये 1800 मेगाहर्ट्झ, 2100 मेगाहर्ट्झ, 2300 मेगाहर्ट्झ 800 मेगाहर्ट्ज आणि 900 मेगाहर्ट्झ बँड असेल. मात्र हे कंपन्यांनुसार हे बदलू शकते.

कंपन्यांनी 5G फोन लाँच केले आहेत

गेल्या एका वर्षात भारतात अनेक फोन कंपन्यांनी 5 जी कनेक्टिव्हिटी असणारे बरीच मॉडेल्स भारतात लाँच केली आहेत. भारत सरकार आपल्या मेक इन इंडिया मोहिमेद्वारे भारताला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याचीही तयारी करत आहे.

या क्षेत्रांना मदत मिळेल

गेल्या वर्षी डेलॉयटेने आपल्या 5G The Catalyst to Digital Revolution in India अहवालात म्हटले आहे की 5G भारतात आल्यामुळे कारखान्यांना रिअल-टाइम पुरवठा करणारे आणि ग्राहकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल आणि ते स्मार्ट व कार्यक्षम होतील. अशी अपेक्षा आहे की 5 जी दूरस्थ औषध, स्मार्ट शहरे, व्हर्च्युअल बँकिंग, 4 k आणि 8 k कंटेंट स्ट्रीमिंग सब्सक्रिप्शन, ऑगमेंटेड रियलिटी (AR), बिग डेटा एनालिटिक्स और आर्टिफिशियल इंटेलिजेंस या क्षेत्रांना फायदा होईल.

भारत सर्वाधिक विकसित देशांच्या तुलनेत मागे

5G नेटवर्क शर्यतीत भारत बर्‍याच विकसित देशांच्या तुलनेत मागे आहे. गेल्या वर्षी नेटवर्क चाचणी प्रदाता व्हीआयएव्हीआयच्या आकडेवारीनुसार, 5G नेटवर्क 34 देशांमधील 378 शहरांमध्ये उपलब्ध होती आणि तेव्हापासून ती वाढली आहेत. त्यावेळी दक्षिण कोरियाने 85 शहरांमध्ये, चीन 57, 5 यूएस, यूकेकडे 5 जी नेटवर्कसह 31 पेक्षा जास्त शहरे आहेत.

5G
तुमच्या सिक्रेट चॅट्स डिलीट न करता WhatsApp मध्ये करा स्टोर; कसं ते जाणून घ्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com