Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

वाढत्या कार्बन उत्सर्जनामुळे महासागरांचं तापमान वाढत आहे. ध्रुवांवरील बर्फ वितळून महासागरातील पाणी देखील वाढत आहे. यामुळे भविष्यात आणखी विचित्र हवामान दिसू शकतं असंही या रिसर्चमध्ये म्हटलं आहे.
Indian Ocean
Indian OceaneSakal

Indian Ocean Global Warming : ग्लोबल वॉर्मिंगबद्दल आपण नेहमी ऐकत वा वाचत असतो. आता जगातील टॉप संस्थांनी केलेलं एक संशोधन समोर आलं आहे. या संशोधनानुसार, हिंदी महासागराचं तापमान हे जगातील इतर महासागरांपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. याचा फटका भविष्यात अरबी समुद्राला, आणि पर्यायाने भारतालाही बसणार असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

हिंदुस्तान टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी (IITM), ऑस्ट्रेलियातील CSIRO, अमेरिकेतील प्रिंसेटन युनिवर्सिटी, फ्रान्समधील सॉर्बोने विद्यापीठ आणि स्वित्झर्लंडमधील बर्न विद्यापीठ या सर्वांनी मिळून हा रिसर्च केला आहे.

वाढत्या कार्बन उत्सर्जनामुळे महासागरांचं तापमान वाढत आहे. यासोबतच ध्रुवांवरील बर्फ वितळून महासागरातील पाणी देखील वाढत आहे. यामुळे भविष्यात आणखी विचित्र हवामान दिसू शकतं असंही या रिसर्चमध्ये म्हटलं आहे.

वेगाने वाढतंय तापमान

या रिसर्चसाठी गेल्या कित्येक दशकांपासून महासागरांच्या तापमानात कशी वाढ झाली हे तपासण्यात आलं. 1950 ते 2020 या काळामध्ये महासागरांचं तापमान हे दर शतकाला 1.2 डिग्री सेल्सिअस एवढं वाढत आहे. मात्र, 2100 या वर्षापर्यंत हा दर 3.8 डिग्री सेल्सिअस एवढ्या वेगाने वाढेल अशी भीती डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी व्यक्त केली. IITM च्या रिसर्चचं नेतृत्त्व त्यांनी केलं आहे.

Indian Ocean
Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

यासोबतच हिंदी महासागराचं 2,000 मीटर खोलीवरील तापमान हे दर दशकाला सुमारे 4.5 झेटा-ज्यूल या वेगाने वाढत आहे. येत्या काही शतकांमध्ये हे प्रमाण वाढून तब्बल 16-22 झेटा-ज्यूल प्रतिदशक होईल असं म्हटलं जात आहे. Zettajoule हे एनर्जीचं मोठं एकक आहे. सुमारे 239 बिलियन टन TNT चा विस्फोट झाल्यानंतर जेवढी एनर्जी तयार होईल, त्याला एक झेटा-ज्यूल समजलं जातं. (Indian Ocean Temperature)

या सगळ्याचा मोठा दुष्परिणाम पृथ्वीवरील सजीवांवर होणार आहे. पाण्याची पातळी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात भूभाग पाण्याखाली जाऊ शकतो. तसंच समुद्राचं तापमान वाढल्यामुळे आतील जैवविविधता देखील नष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. केवळ माशांनाच नाही, तर प्रवाळाच्या विविध प्रजातींनाही याचा फटका बसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com