

TRAI blocks 21 lakh fake numbers in Indias largest digital strike
esakal
Spam Number Blocing Tips : भारतात रोज लाखो लोकांना येणारे स्पॅम कॉल आणि फसवे मेसेज पाठवणारे आता मोठ्या संकटात सापडले आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) गेल्या एका वर्षात तब्बल २१ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स कायमचे डिस्कनेक्ट केले आहेत. एवढेच नव्हे तर सतत स्पॅम पाठवणाऱ्या जवळपास १ लाख संस्था आणि व्यक्तींना ब्लॅक लिस्ट करण्यात आले आहे. ही आतापरत्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.