

Behramji Malabari contribution to women reform in India
esakal
एकोणिसाव्या शतकातील भारतात सामाजिक रूढी, अंधश्रद्धा आणि स्त्रीदमन यांचा प्रभाव प्रचंड होता. बालविवाह, विधवांचे अमानुष जीवन, स्त्रीशिक्षणाचा अभाव आणि धार्मिक कट्टरता या समस्यांनी समाज जखडलेला होता. अशा परिस्थितीत बेहरामजी मालबारी यांनी निर्भीडपणे समाजाच्या जखमांवर बोट ठेवले आणि सुधारणा घडवून आणण्यासाठी लेखणी व कृती यांचा प्रभावी वापर केला.