Reopening the Embassy, Rebuilding Trust: India’s Afghan Policy 2.0

Reopening the Embassy, Rebuilding Trust: India’s Afghan Policy 2.0

E sakal

Premium|Study Room: अफगाणिस्तानशी भारताने मैत्रीचे संबंध का ठेवावे?

India Afghanistan relations : अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानी सरकार आहे. त्यामुळे अशा देशाशी मैत्री करावी की नाही, याविषयी दोन टोकाची मतं आहेत. ही संधी असेल की असंगाशी संग होईल?
Published on

How Amir Khan Muttaqi’s Visit Rekindled India–Afghanistan Dialogue

लेखक : महेश शिंदे

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी ऑक्टोबरमध्ये नवी दिल्ली येथे दाखल झाले, तेव्हा तो एक साधा राजनैतिक दौरा नव्हता तो दोन जुन्या मित्रदेशांमधील नव्या संवाद पर्वाचा आरंभ होता. मुत्ताकी आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर दहशतवादविरोध, परस्पर सार्वभौमत्वाचा सन्मान आणि विकास सहकार्यावर आधारित संयुक्त निवेदन जाहीर झाले. भारताने काबूलमधील आपले दूतावास पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे २०२१ मध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर थांबलेला संवाद पुन्हा सुरू होण्याचे संकेत मिळाले. या दौऱ्याला फक्त राजनैतिक घटना म्हणून पाहता येणार नाही, तर शांततेसाठी पुन्हा उघडलेले दार असे पाहता येईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com