Premium|Study Room : उझबेकिस्तान आणि किरगिझस्तानचा दौरा भारतासाठी इतका महत्त्वाचा का?

India Uzbekistan Kyrgyzstan Relations : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उझबेकिस्तान आणि किरगिझ प्रजासत्ताक दौऱ्यामुळे भारताच्या मध्य आशियातील धोरणात्मक संबंधांना नवी दिशा मिळाली असून व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि जोडणीवर भर देण्यात आला.
India Uzbekistan Kyrgyzstan Relations

India Uzbekistan Kyrgyzstan Relations

esakal

Updated on

मध्य आशियात भारताचे वाढते धोरणात्मक सहकार्य !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य आशियाई प्रदेशातील उझबेकिस्तान आणि किरगिझ प्रजासत्ताक या देशांचा चार दिवसांचा अधिकृत दौरा करून या प्रदेशाशी असलेले धोरणात्मक संबंध अधिक बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या भारताचे मध्य आशियातील पाच देशांशी प्राचीन नाते राहिलेले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या या ताज्या दौऱ्याकडे आणि बिश्केक येथील २६ व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेतील सहभागाकडे जागतिक पटलावर मोठे महत्त्व दिले जात आहे. या भेटीदरम्यान व्यापार, ऊर्जा सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान आणि प्रादेशिक जोडणी यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला.

भारत-मध्य आशिया संबंधांचा ऐतिहासिक वारसा

भारत आणि मध्य आशियातील देशांमध्ये ऐतिहासिक व्यापारी मार्गांच्या काळापासून व्यापारी आणि सांस्कृतिक देवाणघेवाण होत आली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आणि १९९१ मध्ये मध्य आशियातील देशांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने या प्रदेशाशी मित्रत्वाचे संबंध जतन केले आहेत. अलीकडच्या काळात भारताने आपल्या परराष्ट्र धोरणात या भागाला विशेष प्राधान्य दिले आहे. पंतप्रधानांच्या या ताज्या दौऱ्यामुळे उझबेकिस्तानच्या दीर्घकालीन ध्येयांना आणि भारताच्या विकास उद्दिष्टांना जोडणारा नवीन पाया तयार झाला आहे. दोन्ही बाजूंनी परस्परांच्या सार्वभौमत्वाचा आदर करत राजकीय व रणनीतिक संबंध एका नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com