Premium|Study Room : वन्यजीव संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रण; आंतरराष्ट्रीय करारांची देशांतर्गत अंमलबजावणी कशी यशस्वी ठरली?

Stockholm Conference 1972 India Impact : १९७२ च्या स्टॉकहोम परिषदेनंतर भारताने जल, वायू आणि वन्यजीव संरक्षणासाठी कडक कायदे करून जागतिक पर्यावरण करारांच्या अंमलबजावणीत आघाडी घेतली असून, दुर्मिळ प्रजातींच्या जतनासाठी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी धोरणात्मक चौकट उभी केली आहे.
Stockholm Conference 1972 India Impact

Stockholm Conference 1972 India Impact

esakal

Updated on

लेखक : सुदर्शन कुडचे

पर्यावरण संरक्षण हा आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचा विषय ठरला आहे. हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास आणि प्रदूषण यांसारख्या समस्या सर्व देशांसमोर उभ्या आहेत. या पार्श्वभूमीवर विविध आंतरराष्ट्रीय करारांची निर्मिती झाली आणि भारतानेही त्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. या करारांची अंमलबजावणी देशांतर्गत पातळीवर कायदे आणि धोरणांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

स्टॉकहोम परिषद आणि भारतातील प्रारंभिक उपाययोजना

१९७२ मधील स्टॉकहोम परिषदेनंतर भारताने पर्यावरण संरक्षणाला धोरणात्मक महत्त्व दिले. यानंतर १९७४ मध्ये जल प्रदूषण नियंत्रणासाठी कायदा करण्यात आला आणि १९८१ मध्ये वायू प्रदूषण नियंत्रणासाठी कायदा लागू करण्यात आला. पुढे १९८६ मध्ये व्यापक पर्यावरण संरक्षणासाठी कायदा तयार करण्यात आला, ज्यामुळे विविध पर्यावरणीय विषयांना एकत्रित चौकट मिळाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com