Premium|Study Room : प्रदूषण आणि निवडणुकांचे कारण? २०२८ च्या जागतिक हवामान परिषदेचे यजमानपद भारताने नाकारले

India COP 33 Withdrawal : भारताने २०२८ मधील 'COP 33' जागतिक हवामान परिषदेच्या यजमानपदाचा प्रस्ताव अनपेक्षितपणे मागे घेतला आहे. आगामी निवडणुका, वाढते प्रदूषण आणि ७५ हजार पाहुण्यांच्या नियोजनातील आव्हाने लक्षात घेता सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे समजते.
India COP 33 Withdrawal

India COP 33 Withdrawal

esakal

Updated on

लेखक : प्रतिक बाबर

‘भारताची COP 33 यजमानपदावरून अचानक माघार’ भारताने २०२८ मध्ये होणाऱ्या युएनएफसीसीसी (UNFCCC) च्या ३३ व्या बैठकीचे (COP 33) यजमानपद भूषवण्याचा आपला प्रस्ताव मागे घेतला आहे. २०२३ साली दुबईमध्ये झालेल्या २८व्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२८ साली परत आशिया-पॅसिफिकची पाळी असलेली ३३वी बैठक भारतात आयोजित करण्याचा मनसुबा व्यक्त केलेला होता.

त्याच वेळी दक्षिण कोरियाने आपणही ही बैठक आयोजित करण्यासाठी उत्सुक असल्याचे संकेत दिले होते. हे यजमानपद भारताकडेच येईल, असा अंदाज होता; पण आता भारताने माघार घेतल्याने बहुदा ही बैठक दक्षिण कोरियात होईल. यापूर्वी २००२ मध्ये भारताने (नवी दिल्ली) ‘COP 8’ चे आयोजन केले होते, ज्यात सुमारे ५,५०० सहभागी आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com