
GST 2.0 and Its Impact on Consumers, States, and Economy
E sakal
श्रीकांत जाधव
प्रस्तावना - भारतामध्ये २०१७ मध्ये लागू झालेली वस्तू व सेवा कर (GST) ही आजवरच्या सर्वांत मोठ्या करसुधारांपैकी एक मानली जाते. केंद्र व राज्य सरकारांच्या करव्यवस्थेला एकसंध चौकटीत आणत राष्ट्रीय स्तरावर एकात्मिक बाजारपेठ घडवून आणण्याच्या उद्देशाने जीएसटीची संकल्पना कार्यान्वित करण्यात आली. या सुधारणेने केवळ कर रचना सुलभ झाली नाही, तर पुरवठा व्यवस्थेलाही गती मिळाली. आठ वर्षांनंतर सप्टेंबर २०२५ मध्ये ‘GST 2.0’ म्हणून ओळखली जाणारी नवी रचना अमलात आणण्यात आली आहे. यामुळे भारतातील अप्रत्यक्ष कराच्या जगतात नवे पर्व सुरू झाले आहे. या बदलांचा मूलभूत हेतू म्हणजे कररचना सोपी करणे, करदात्यांना दिलासा देणे आणि त्याचे फायदे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणे. पण, यासोबत काही आव्हाने कायम असून त्यांचा विचार आवश्यक आहे.