
illegal immigration in India
E sakal
लेखक : सचिन शिंदे
भारताच्या सीमेवरून होणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतराची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. आसाम व बिहारमध्ये मतदार यादीतील घुसखोरीच्या ताज्या आरोपांमुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही समस्या केवळ सीमा ओलांडणाऱ्या लाखो लोकांपुरती मर्यादित नसून देशाची लोकशाही, शहरे, संसाधने व राष्ट्रीय सुरक्षेवरील बहुआयामी परिणामांची आहे.