
विपुल वाघमोडे
भारतीय तत्त्वज्ञानाच्या समृद्ध परंपरेमध्ये जैनधर्म हा एक अत्यंत प्राचीन आणि प्रभावी धर्म आहे. अहिंसा, अपरिग्रह व आत्मशुद्धीवर आधारित हे तत्त्वज्ञान केवळ धार्मिक परिपाठापुरते मर्यादित न राहता सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय व्यवहारातही मार्गदर्शक ठरले आहे.
जैन धर्म हा सामाजिक, नैतिक आणि बौद्धिक क्रांतीचा द्योतक ठरला आहे. जैन धर्म वैदिक समाजव्यवस्थेतील रूढी, विषमता, हिंसा व कर्मकांडाविरोधात एक शक्तिशाली आणि नैतिक पर्याय ठरला.