
नाशिक : (सटाणा) ग्रामस्थांनीच ग्रामसेवकांना कार्यालयात डांबुन ठेवत बागलाणचे गटविकास अधिकारी कोल्हे यांना घेराव घालून आक्रमक होऊन सामाजिक अंतराला हरताळ फासत तीव्र आंदोलन केले. का झाले नागरिक इतके संतप्त... वाचा काय घडले नेमके?
असा आहे प्रकार
भाक्षी येथील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणारी विहिर तुडूंब भरून असतांनादेखील ऐन पावसाळ्यात मागील दहा दिवसांपासुन भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. परिसरातील विजेचे दिवे बंद तसेच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरोग्याची एैशी तैशी झाल्याने ग्रामस्थांनी ग्रामसेवकांना कार्यालयात डांबुन ठेवत बागलाणचे गटविकास अधिकारी कोल्हे यांना घेराव घालून आक्रमक होऊन सामाजिक अंतराला हरताळ फासत तीव्र आंदोलन केले. सटाणा शहराला लागून असलेल्या भाक्षी ग्रामपंचायत हद्दीतील रामनगर, शरद नगर, फुले नगर, आदी परिसरात ऐन पावसाळ्यात गत दहा दिवसांपासुन ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा बंद आहे. ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा विहिर भरलेली असतांना देखील ही पाणीपुरवठा बंद असल्याने नागरीकांना उन्हाळ्याप्रमाणेच पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून रस्ता ओलांडून सटाणा नगर परिषदेच्या हद्दीतील नागरींकाकडून पाणी भरावे लागत आहे.
ग्रामसचिवांना दालनात कोंडले
या नववसाहतीमधील स्ट्रीट लाईट गेल्या अनेक दिवसांपासुन बंद आहेत. वारंवार तक्रार करून सुधारणा होत नाही, तसे नववसाहत परिसरा पावसाच्या पाण्यामुळे डबके साचून आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच गटारी नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून थेट घरात घुसू लागल्याने संतप्त झालेल्या रहिवाशांनी आज ग्रामसचिव पंकज पवार यांना दालनात कोंडले. यावेळी नजीकच असलेल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी. एस कोल्हे आंदोलनस्थळी आल्यावर त्यांनाच घेराव घालून निवेदन सादर केले.
(संपादन - किशोरी वाघ)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.