नाशिक : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी केली. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषिमंत्री दादा भुसे यांना पत्र लिहिले आहे.
नुकसानीचा आढावा घेतला
संसदेचे अधिवेशन आटोपून परतताच भ्रमणध्वनीवरून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नुकसानीचा डॉ. पवार यांनी आढावा घेतला. पुरामुळे बऱ्याच गावांचा संपर्क तुटला आहे. अनेकांची घरे तसेच रस्ते पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहेत. शेतातील उभी पिके पावसाच्या पाण्याखाली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उभ्या पिकांसह शेत वाहून गेले आहे. शिवाय नुकसानीचे पंचनामे होत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या, असे डॉ. पवार यांनी म्हटले आहे.
तत्काळ सरसकट नुकसानभरपाई
अगोदरच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. जीवनमान विस्कळित झाले असताना निसर्गाने अवकृपा केल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट नुकसानभरपाई मिळावी असे खासदार डॉ भारती पवार म्हणाल्या.
संपादन - रो्हित कणसे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.