शेतकऱ्यांनो कांदा सांभाळा! जायखेडा कांदाचाळीतून आठ क्विंटल कांदा चोरीस; परिसरात घबराट

onion theft.jpg
onion theft.jpg

नाशिक : (जायखेडा) सध्या मोसम परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला असून, चोरट्यांनी आपला मोर्चा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चाळीकडे वळविल्याने परिसरात घबराट पसरली आहे. जायखेडा (ता. बागलाण) येथील नसीरखा रज्जाखा पठाण यांच्या कांदाचाळीतून सुमारे आठ क्विंटल कांदा शुक्रवारी (ता. २३) रात्री चोरट्यांनी चोरून नेला. वाचा काय घडले?

कांद्यावर चोरांनी केला हात साफ 

सध्या कांद्याला सोन्यासारखा भाव मिळू लागल्याने सोन्यासारखीच कांद्याचीही चोरी होऊ लागली आहे. याचा प्रत्यय जायखेडा येथील शेतकऱ्यांना येऊ लागला आहे. येथील नसीरखा पठाण यांच्या शेतातील चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यावर चोरांनी हात साफ केला. दुष्काळावर मात करत कांद्याचे उत्पादन घेतले होते. बराचसा कांदा मिळेल त्या भावात विक्री केला होता व काही कांदा सडला. तर उरलेला चांगला कांदा निवडून ठेवला होता. या कांद्याल तरी चांगला भाव मिळेल, या आशेने चाळीत साठवून ठेवला होता. सायंकाळी श्री. नसीरखा पठाण यांचा मुलगा रात्री आठला शेतीला कुंपण असलेल्या गेटला कुलूप लावून घरी परतला. त्यानंतर सकाळी पाचच्या सुमारास दुभती जनावरांचे दूध काढण्यासाठी गेले असता, त्यांना चाळीतील साठवलेला कांदा चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सांगितले. 

पहाटे कांदा गायब

रात्री एकच्या सुमारास चोरट्यांनी कांदाचाळीच्या मागील बाजूस कांदा भरून ठेवलेले क्रेट्ससह रस्त्यावर उभ्या अज्ञात वाहनाने पोबारा केला. याबाबत जायखेडा पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com