शेतकरी हतबल.. पावसामुळे महागाचे बियाणे पाण्यात..कांद्याचे रोप तयार करणे ठरणार महागडे

dewla  11.jpg
dewla 11.jpg

नाशिक / देवळा : कसमादे भागात खरीप हंगामात पोळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. उन्हाळ कांदा खराब झाला किंवा त्याची टंचाई निर्माण झाली तर हा कांदा चांगले पैसे देऊन जातो हा शेतकऱ्यांचा दर वर्षीचा अनुभव आहे. त्यासाठी दर वर्षी जून-जुलै महिन्यात कांदा उत्पादक शेतकरी कांदा बियाणे पेरणी करत रोप तयार करतात.

दहा ते बारा हजारांचे बियाणे वाया

यंदाही अनेक शेतकऱ्यांनी कांद्यांसाठी शेते मोकळी ठेवत कांदा बियाणे पेरणी केली. मात्र पावसाची रोजच जोरदार हजेरी लागत असल्याने या उळ्याच्या उगवणक्षमतेवर परिणाम झाला आहे, तर काहींचे सडू लागले आहे. कांदारोप तयार करतेवेळी प्रमाणात पाणी असणे गरजेचे असते. आधीच दहा ते बारा हजार रुपये पायलीचे महागाचे उळे खरेदी करत ते शेतात टाकले आहे. परंतु पावसाने त्याची लय बिघडवून टाकल्याने नवीन उळे टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

शेतकऱ्याची अवस्था अवघड

एकीकडे कांद्याला भाव नाही अन्‌ दुसरीकडे उळे इतके महाग! त्यात पावसामुळे उळे खराब होऊ लागल्याने शेतकऱ्याची अवस्था अवघड झाली आहे. शासनाने कांद्याची भाववाढ करून दिलासा द्यावा. -समाधान पगार, खडकतळे, ता. देवळा 

यंदा कांद्याचे रोप तयार करणे ठरणार महागडे

जूनच्या सुरवातीपासून मोठ्या प्रमाणात व रोजच पडणाऱ्या पावसाने खरीप कांद्याचा हंगाम उद्‌ध्वस्त केला आहे. दहा-बारा हजार रुपये पायलीचे कांद्याचे रोप पावसामुळे रोगट झाले आहे, पावसामुळे यंदा कांद्याचे रोप तयार करणे महागडे ठरणार आहे. -दत्ता मराठे, शेतकरी, मेशी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com