विम्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात; ऐन दिवाळीत धरणे धरण्याचा इशारा 

farmer vanchit.jpg
farmer vanchit.jpg

काळुस्ते (जि.नाशिक) : ऑक्टोबरमधील अवकाळी पावसाने २० ते २५ तारखेदरम्यान इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांत भातशेतीसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीची विमा कंपन्या दखल घेत नसल्याने ऐन दिवाळीत इगतपुरी तालुक्यातील शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. विमा कंपन्यांविरोधात शेतकरी महामार्गावर धरणे आंदोलन करतील, असा इशारा बाजार समितीचे माजी संचालक पांडुरंग शिंदे यांनी दिला.

शेतकऱ्यांपुढे अडचणी निर्माण

ऑक्टोबरअखेर ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसानभरपाईबाबत दावा केला असेल, त्यांना पात्र ठरवून विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शिंदे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांसह विमा कंपनी प्रशासनाकडे केली आहे. त्यात, भारतीय जनरल विमा कंपनीची यंत्रणाही विस्कळित होऊन टोल फ्री क्रमांकावर संपर्क करूनही दूरध्वनी लागत नव्हते. मोबाईल टॉवरही बंद पडल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपुढे अडचणी निर्माण झाल्या. विमा कंपनीकडून जनजागृतीही झाली नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील पीकविमाधारक असंख्य शेतकरी आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com