नाशिक / येवला : ती जाडी असून, तिच्या नवऱ्याला ती शोभत नाही. ती व्यवस्थित कामधंदा करीत नाही तसेच तिने माहेरून कानातील सोन्याचे झुबे व कुडके करून आणली नाहीत. शिवाय शेतात पाइपलाइनसाठी व रोटर घेण्यासाठी दोन लाख रुपये आणले नाहीत म्हणून त्रास दिला जात होता. अखेर नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल..
असा घडला प्रकार
दीड महिन्यापूर्वी नायगाव (ता. श्रीरामपूर) येथील पूजाचा विवाह अंगणगाव येथील संदीपबरोबर झाला होता. मात्र दीड महिन्यातच पूजाला सासरकडच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरवात केल्याने अखेर पूजाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या वेळी विवाहितेचे वडील बाळासाहेब भारसकळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की पूजाचा लग्नानंतर शारीरिक व मानसिक त्रास सुरू झाला होता. ती जाडी असून, तिच्या नवऱ्याला ती शोभत नाही. ती व्यवस्थित कामधंदा करीत नाही तसेच तिने माहेरून कानातील सोन्याचे झुबे व कुडके करून आणली नाहीत. शिवाय शेतात पाइपलाइनसाठी व रोटर घेण्यासाठी दोन लाख रुपये आणले नाहीत म्हणून त्रास दिला जात होता. या प्रकरणी मनमाड उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंग साळवे तसेच पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
विवाहितेच्या पतीसह सासरा, दीर यांना पोलिसांनी केली अटक
दीड महिन्यापूर्वी विवाह झालेल्या अंगणगाव (ता. येवला) येथील नवविवाहितेने सासरकडच्या मंडळींकडून सुरू झालेल्या जाचास कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. पूजा संदीप आठशेरे (वय 22) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, विवाहितेच्या पतीसह सासरा, दीर यांना पोलिसांनी अटक केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.