नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘विकेल ते पिकेल’ या योजनेंतर्गत नाशिकसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला विक्रीसाठी शेतकरी गट, तसेच शेतकरी उत्पादन कंपन्यांना मुंबईसह उपनगरांत जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्याकडे केली.
जागा उपलब्ध नसल्यामुळे अडचणी
नाशिक शहर- जिल्ह्यातील शेतमालाला मुंबई, कल्याण, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांत मागणी लक्षात घेता जिल्ह्यातील शेतकरी गट, कृषी विज्ञान गट, कृषी विज्ञान मंडळ, ग्रीन फ्रिल्ड ॲग्रो सव्हिर्सेस, नॅचरल फुड्स कार्नर प्रोड्युसर कंपन्यांना मुंबईसह परिसरात विक्री जागा उपलब्ध नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी खासदार गोडसे यांनी मुंबई कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्याशी चर्चा केली.
नाशिकच्या शेतकऱ्यांना मुंबईत जागा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आलेली ‘विकेल ते पिकेल’ ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांच्या गटांना मुंबईत जागा उपलब्ध होत नसल्याची अडचण खासदार गोडसे यांनी मांडली. शेतकऱ्यांना शेतीमाल थेट ग्राहकांना विक्री करता यावा, यासाठी ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेअंतर्गत नाशिकच्या शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला मुंबईत जागा उपलब्ध करून द्यावी. यासंदर्भात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण या महापालिका प्रशासनाची बैठक लावणार असल्याचे डवले यांनी खासदार गोडसे यांना सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.