
निफाड (जि. नाशिक) : देशभरात कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांचा एल्गार सुरू आहे. त्याला राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने पाठिंबा दिला आहे. परंतु या महत्त्वाच्या बाबीत शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनाचा प्रश्न असणाऱ्या वीजवाहन तारांसंदर्भात कमालीचे दुर्लक्ष आहे. उघड्या डीपी, सडलेले खांब आणि शिवरात लोंबकळणाऱ्या तारा निफाड तालुक्यातील बळीराजाच्या जिवाचा कोंडमारा होण्यास कारणीभूत ठरत आहे.
जीव मुठीत धरून करावे लागते काम
निफाड तालुक्यात वीजवाहक तारांच्या संदर्भात अनेक तक्रारी आहेत. मात्र याकडे महावितरण प्रशासनाकडून सफाईदारपणे दुर्लक्ष होते. तालुक्यात आजही १९६२ पासून अनेक ठिकाणी खांबांचे नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे लाइनचे खांब जमिनीत सडलेले आहे, तर काही ठिकाणी उघड्या असलेल्या डीपी शेतकऱ्यांची जिवावर उठत आहे. दरम्यान, शेतात लोंबकळणाऱ्या तारांमुळे उसाला आग लागल्याचे उदाहरण ताजी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतशिवारात काम करताना जीव मुठीत धरून काम करावे लागते.
निवेदन देऊनही कारवाई नाही
यातच वादळवारे, पाऊस आला की संबंधित खांब कोसळतात आणि शेतशिवारातील वीज गायब होते, हे नेहमीचेच झालेली आहे. यासंदर्भात खडकमाळेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीला जुन्या झालेल्या विजेच्या तारा, उघड्या डीपी आणि लोंबकळणाऱ्या तारा या सर्व परिस्थितीचे नूतनीकरण व्हावे आणि शेतकऱ्यांना या संकटातून मुक्त करावे या संदर्भात निवेदन देऊनही कुठलीही कारवाई होत नाही.
ग्रामीण भागातील विद्युत वितरण मंडळाच्या यंत्रणा म्हणजे नुसताच देखावा आहे. शेतशिवारातील जीर्ण झालेले विजेचे खांब, तुटलेले तारा, लोंबकळणाऱ्या विद्युतवाहक तारा, अस्ताव्यस्त अवस्थेतील ट्रान्स्फॉर्मरची अवस्था व त्यामुळे होणारे अपघात असे चित्र बहुतांश ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे यंत्रणेचे नूतनीकरण करत बळीराजावरील संकट दूर करावे.
-विकास रायते, खडक माळेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.