नाशिक : आईवरुन शिवीगाळ केल्याच्या रागातून पोटात चाकू खुपसून खून केला. या प्रकरणी १० वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा झाली. काय घडले तेव्हा वाचा..
असा घडला प्रकार
शहरात महापालिकेच्या तलवाडी जलशुध्दीकरण केंद्राच्या परिसरात २८ ऑगस्ट २०१७ ला संपत काशिनाथ कडाळे (दिंडोरी) व गणेश राजाराम जाधव (वय २६) यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्यात, संपत कडाळे याने आईवरुन शिवीगाळ केल्याने त्याचा राग येउन गणेश उर्फ विन्या जाधव याने खिशातून चाकू काढून छातीवर वार करुन खून केला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांतर्फे तत्कालीन सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. राजू भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्हा शाबीत होण्याच्या दृष्ट्रीने भक्कम पुरावे सादर करीत, दोषारोपपत्र दाखल केले. नाशिक येथे जिल्हा सत्र न्यायधीश क्रमांक पाच व्ही.पी. देसाई यांच्या न्यायालयात सुनावणी होउन परिस्थितीजन्य पुराव्यानुसार संशयिता विरोधात आरोप स्पष्ट झाला.
१० वर्षाची सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड
न्यायालयाने आज बुधवारी (ता.३०) दोन्ही बाजूच्या युक्तीवाद ऐकल्यानंतर गणेश जाधव याला १० वर्षाची सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड. दंड न भरल्यास आणखी ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.सरकारी पक्षातर्फे सरकारी वकिल एस.एस.कोतवाल यांनी कामकाज पाहिले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.