स्वस्त वीज खरेदीच्या नावाखाली ग्राहकांच्या खिशाला कात्री!...नेमकं चाललंय काय?

electricity bill .jpg
electricity bill .jpg

नाशिक : सामान्य ग्राहकाला वीज स्वस्त द्यावी म्हणून महानिर्मितीचे संचांना बंद ठेवून खासगीला प्राधान्य दिले जात आहे. वीजदर कमी कसे करता येईल, याची कारणमीमांसा न करता संच बंद ठेवण्याचा प्रपंच सुरू झाला आहे. 

वीजदर महाग पडते म्हणून संच बंद

महानिर्मिती कंपनीचे चंद्रपूर, कोराडी, भुसावळ आदी ठिकाणी नवीन संच असतांनाही भुसावळची निर्मिती शून्यावर आहे. कोट्यवधी रुपये खर्चून 660 व 500 मेगावॉटचे संच उभारण्यात आले असतांना वीजदर महाग पडते म्हणून संच बंद ठेवून खासगी वीज केंद्राकडून कमी दरात ग्राहकांसाठी वीज उपलब्ध करून देण्याचे कारणे दाखवून सरकारी प्रकल्पातील संच बंद ठेवण्यात येत आहेत, हे कितपत योग्य आहे, असा संशयास्पद प्रश्‍न निर्माण होऊ लागला आहे. 

घरगुती ग्राहकांच्या मानगुटीवर दर
 
वीजदर घरगुती ग्राहकांना 0 ते 100 साठी 3.05, पण प्रत्यक्षात किती? हा विचार करणारा प्रश्‍न झाला आहे. घरगुती ग्राहकांसाठी 3.05 पैसे देत असतांना स्थिर आकार, वहन आकार @1.28, इंधन समायोजन आकार, 16 टक्के वीजशुल्क आदी आकारांच्या नावाखाली वसुली केली जाते. वीजबिल युनिट पाच ते आठ रुपये पडते, मग सामान्य ग्राहकास कोणते बिल कमी येते? हा प्रश्‍न निर्माण होतो. असे असतांना सरकारी प्रकल्पांमधील संच बंद ठेवून खासगी उद्योगांकडून कमी वीजदराच्या नावाखाली खरेदीचा घाट कशासाठी? असा प्रश्‍न उपस्थित होतो. 

दर कमी करण्यासाठी हवेत प्रयत्न 

इंधन खर्च हा औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला लागणाऱ्या एकूण खर्चाचा 85 टक्के इतका असतो. इंधनाचे नियोजन योग्य पद्धतीने झाल्यास वीजनिर्मितीचा खर्च कमी येतोच. जर शासनाच्या वीज केंद्रात इंधनाच्या नियोजनास मर्यादा आल्यास त्याचा विजेचा दर हा खासगी वीज केंद्रापेक्षा नक्कीच जास्त असेल. कोळसा योग्य दराने व चांगला उष्मांक देणारा खरेदी व्हावा, कोळसा वहन डॅमेज खर्चात बचत, अनावश्‍यक खर्चांना हवा ब्रेक, संचांना वारंवार बॅकिंग डाऊन नको, नवीन संच पूर्ण क्षमतेने चालवावे, इंधनाची बचत, तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारे निर्मिती खर्चात बचत केल्यास निर्मितीदर कमी येऊ शकतात. 

राज्याची संचांची सद्यःस्थिती 

कोराडी संच सहा व सात, भुसावळ संच तीन, चार व पाच, नाशिक संच तीन झीरो शेंडूल्डमध्ये बंद, भुसावळ आणि नाशिक या दोन संचांचे कोळसा खासगी वीज केंद्रांना वळविण्यात आले असल्याने बंद. चंद्रपूर संच 3 बॉयलर मुदत वाढीसाठी, तर संच पाच वार्षिक देखभालीसाठी, असे एकूण 30 पैकी 12 संच बंद. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com