जीवनाचा शेवटही मित्रांसोबतच! दोन्ही शाळकरी मित्रांची एकत्रच अंत्ययात्रा; गावाने फोडला हंबरडा

selu two boys.jpgselu two boys.jpg
selu two boys.jpgselu two boys.jpg

नाशिक :  सेलू (ता. चांदवड) येथे दुपारी दीडच्या सुमारास शेलू नदीत अंघोळ करायला तीन मित्र गेले. सदैव एकत्र राहणाऱ्या मित्रांचा हात जीवनाच्या शेवटीही घट्टच होता. त्यांच नदीवर अंघोळ करणं त्यांच्या जीवावर बेतले आहे. काय घडले वाचा..
 

नदीवर अंघोळ करणं बेतले जीवावर
ओम काशीनाथ भालेराव (वय १३, इयत्ता सातवी) आणि धीरज आप्पा खैरनार (वय १४, इयत्ता आठवी), वैभव वसंत वाघ (वय १२)अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत.  हे तिघे शेलू नदीत अंघोळ करत असताना पाय घसरून नदीत पडले. ग्रामस्थांच्या लक्षात ही बाब येतात त्यांनी तातडीने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ओम व धीरज यांचा मृत्यू झाला होता. सेलू (ता. चांदवड) येथे दुपारी दीडच्या सुमारास शेलू नदीत अंघोळ करताना दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बडून मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत गेलेला वैभव वाघ याला वाचविण्यात यश आले आहे.

दोघांवर सेलू येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार

अरुण मांगू माळी आणि बाळू भालेराव यांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले. चांदवड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास दोघांवर सेलू येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. हे दोघेही मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील होते. ओम हा एकुलता मुलगा होता. दोन्ही कुटुंबीयांना शासनाने योग्य ते सहकार्य करावे, अशी मागणी संजय भांबर व शंकर जाधव यांनी केली आहे. 

देवनदीत तरुण गेला वाहून 

जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जण पाण्यात बुडाले असून, सेलू (ता. चांदवड) येथील दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. तर, वडांगळी येथे देवनदीत एक तरुण वाहून गेला आहे. त्याचा अद्याप शोधही लागला नाही, तसेच ओळखही पटलेली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com