नाशिक/ येवला : जोरदार परतीच्या पावसाने दमदार खरिपाच्या विविध पिकांना फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यांचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. साहजिकच भाजी मंडईतील विविध भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. भाजीपाला खरेदी करताना सामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे.
विविध खरीप पिकांचे नुकसान
अतिपावसामुळे शेतशिवारात पाणी साचून मोठ्या प्रमाणात भाजीपाला खराब झाल्याने विविध प्रकारच्या भाजीपाल्यांची बाजारपेठेत आवक कमी झाली आहे. त्यातूनच हा भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. परतीच्या पावसाच्या तडाख्यात शेतशिवारातील विविध खरीप पिकांचे नुकसान होतानाच भाजीपाल्याला देखील मोठा फटका बसला आहे. परिणामी भाजी मंडईत भाज्यांची आवक कमी होवून त्याचा दृश्य परिणाम बाजारपेठेत दिसू लागला आहे.
काही भाज्या पूर्वीच्या दरानेच
भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने साहजिकच मंडईतील विविध भाजीपाल्यांचे दर वाढल्याने ग्राहकांना खिशाला त्याची झळ बसली आहे. घाऊक अन् किरकोळ बाजारपेठेत भाज्यांना महागाईची फोडणी बसली आहे. पण काही भाज्या जसे की कोथिंबीर जुडी, वांगी, भेंडी या भाज्या पूर्वीच्या दरानेच मिळत असल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळत आहे.
असे आहेत दर
मेथीची जुडी-२५ रुपये
गिलके-६० रुपये किलो
दोडके-८० रुपये किलो
सिमला मिरची-८० रुपये किलो
गवार-१०० रुपये किलो
बटाटे - ६० ते ७० रुपये
टोमॅटो - ३० ते ४० रुपये
वालच्या शेंगा-८० रुपये किलो
फ्लॉवर- ८० रुपये किलो
कोबी-२५ रुपयाला गड्डा
हिरवी मिरची-७० रुपये किलो
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.