दमणगंगा, नार-पार जोडणार : गडकरी

दमणगंगा, नार-पार जोडणार : गडकरी

नाशिक- मराठवाड्यासह नाशिक व नगर जिल्ह्यातील पाणीप्रश्‍न कायमचा सोडविण्यासाठी दमणगंगा, नार-पार नदीजोडणी प्रकल्प राबविला जाणार असून, केंद्र सरकारने तीस हजार कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. दमणगंगा, नार व पार नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी ठाणे जिल्ह्यात धरणांची निर्मिती केली जाणार असून, महाराष्ट्र व गुजरात सरकारमध्ये येत्या काही दिवसांत या अनुषंगाने सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरवात होईल, असे केंद्रीय परिवहन व जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी  सांगितले.

के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने कर्मवीर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. गडकरी म्हणाले, की देशात पाण्याची कमतरता नाही; परंतु नियोजन नसल्याने टंचाई आहे. ठाणे जिल्ह्यातील पावसाचे पाणी गुजरातकडे जात असल्याने ते धरणांच्या माध्यमातून दमणगंगा, नार व पार नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात वळविले जाणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com