Farmers Protest
sakal
धुळे: विकासाला विरोध नाही. पण विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा खून केला जात आहे, असा आरोप करीत मनमाड-इंदूर रेल्वेमार्गांतर्गत बाळापूर ते पुरमेपाडा दरम्यानच्या भूसंपादनासाठी आलेल्या जमीन मोजणी पथकाला सोमवारी (ता. १६) शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करीत परत पाठविले. दरम्यान, शासनाने योग्य मोबदला दिल्यास शेतकरी आपल्या जमिनी द्यायला तयार आहेत, असेही मनमाड- इंदूर (बाळापूर- पुरमेपाडा) रेल्वेमार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीने म्हटले आहे.