Dhule Jal Jeevan Mission : धुळ्यात 'जल जीवन मिशन'ची गती मंदावली; २०२५ संपले तरी ५२ टक्के कामे कागदावरच!

Jal Jeevan Mission Progress in Dhule District : धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत नळपाणी योजनांची कामे सुरू असली तरी निधीअभावी आणि तांत्रिक अडचणींमुळे गती मंदावली आहे.
Dhule Jal Jeevan Mission

Dhule Jal Jeevan Mission

sakal 

Updated on

धुळे: ग्रामीण भागातील प्रत्येक घरात २०२४ पर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याचे केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी ‘जल जीवन मिशन’ जिल्ह्यात अतिशय संथ गतीने सुरू आहे. ऑगस्ट २०१९ पासून सुरू झालेल्या या योजनेत जिल्ह्याचे लक्ष्य गाठायचे झाल्यास कामांची गती वाढवणे गरजेचे आहे. २०२५ संपत आले असताना जिल्ह्यात केवळ ४८ टक्के कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झाली असून, अजूनही ५२ टक्के कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रत्येक घरात पाणी कधी पोहोचणार हा प्रश्न भेडसावत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com