विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

north maharashtra university students fee
north maharashtra university students fee

जळगाव ः कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आज महत्वाचा निर्णय घेतला. अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ लक्षात घेऊन विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालये/परिसंस्था व विद्यापीठ प्रशाळांमधील सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. अंदाजे पावणे दोन लाख विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. 
कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. पी. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.9) व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. बैठकीस प्र-कुलगुरु प्रा. पी. पी. माहुलीकर, दिलीप पाटील, प्रा. रत्नमाला बेंद्रे, प्राचार्य एल. पी. देशमुख, प्रा. नितीन बारी, दीपक पाटील, विवेक लोहार, डॉ. जे. बी. नाईक, डॉ. प्रिती अग्रवाल, तंत्रशिक्षणचे प्रभारी संचालक बी. पी. नाथे, कुलसचिव भ. भा. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी. पी. पाटील आदी उपस्थित होते. 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, युवा सेना, दर्जी फाऊंडेशन आणि विद्यापीठ विकास मंच या संघटनांकडून अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी विद्यापीठाकडे केली होती. बैठकीत या संघटनांच्या निवेदनावर सविस्तर चर्चा झाली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांचे बहुसंख्य पाल्य शेतकरी आहेत. अशा परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा; अशी भूमिका दिलीप पाटील यांनी मांडली. प्राचार्य एल. पी. देशमुख, दीपक पाटील, प्रा. नितीन बारी व इतर सदस्यांनी याबाबत भावना व्यक्त केल्या. 

एकमताने घेतला निर्णय 
सामाजिक बांधिलकीच्या नात्याने विद्यापीठाने वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. आता खानदेशात अतिवृष्टीचे संकट लक्षात घेऊन सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे, असे मत व्यक्त झाले. चर्चेअंती परिक्षेत्रातील संलग्नित सर्व महाविद्यालये/परिसंस्था आणि विद्यापीठ प्रशाळांमधील सरसकट सर्व विद्यार्थ्यांचे मार्च-एप्रिल/मे 2020 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची ही संख्या अंदाजे 1 लाख 75 हजार एवढी आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने परीक्षांच्या कामाचे मानधन प्राध्यापकांनी घेऊ नये, असे आवाहन प्राध्यापकांच्या दोन्ही संघटनांना व्यवस्थापन परिषद सदस्यांच्यावतीने करण्याचेही ह्या बैठकीत ठरले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com