अकरावी प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात

Mission-Admission
Mission-Admission

जळगाव - शहरात अकरावी कनिष्ठ महाविद्यालयांत कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखा यासाठी प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, ८० टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. शहरातील विविध महाविद्यालयांत आतापर्यंत ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. 

अकरावीच्या प्रथम, द्वितीय, तिसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता चौथ्या यादीतील तसेच मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश दिले जात आहेत. अकरावीचे प्रवेश खुले झाले असून, वंचित विद्यार्थ्यांना प्रवेशाची अखेरची संधी राहणार आहे.

अकरावी प्रवेशासाठीच्या पहिल्या दुसऱ्या गुणवत्ता यादीने यंदा प्रथमच उच्चांक गाठला. पहिल्या यादीत विज्ञान शाखेचा कट ऑफ ८५.८० टक्‍क्‍यांवर गेला, तर वाणिज्यचा कट ऑफ ८७.८० टक्‍क्‍यांवर गेला. त्यामुळे पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश अल्प प्रमाणात झाले होते. यानंतरच्या दोन्हीही गुणवत्ता याद्या यंदा उच्चांकी राहिल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर तिसऱ्या, चौथ्या यादीनंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक कॉलेजात मेरिट अर्ज भरल्याने प्रवेश अर्जांची संख्या वाढली. प्रत्यक्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा पहिल्या दोन्ही याद्यांनंतर अल्प प्रतिसाद लाभला. अकरावीच्या शहरातील महाविद्यालयांत ७ हजार ८६० जागा आहेत. पहिल्या चारही याद्यांनुसार आतापर्यंत ८० टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com