नाशिक - शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी संसद घेराव आंदोलनासाठी नाशिक जिल्ह्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या शेतकरी आघाडीतर्फे हजारो शेतकरी दिल्लीला रवाना झाले आहेत.
देशातील प्रमुख 32 पक्ष व 232 सामाजिक संघटना एकत्र येत खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या अखिल भारतीय संघर्ष समन्वय समितीमार्फत 29 व 30 नोव्हेंबरला संसदभवनास घेराव घालणार आहेत. या आंदोलनाला खासदार राजू शेट्टी यांच्यासह समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुला आदी उपस्थित राहतील.
|