जिल्ह्यात सव्वासहा लाख हेक्‍टरवरील पंचनामे पूर्ण 

farmer panchnama farm
farmer panchnama farm

जळगाव ः जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे आजअखेर सहा लाख 17 हजार हेक्‍टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. आज सुटीच्या दिवशीही कृषी विभागाने पंचनाम्याची कामे केली आहेत. उद्यापर्यंत (ता. 10) संपूर्ण पंचनामे होतील, अशी माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. 

जिल्ह्यात 24 ऑक्‍टोबरपासून विविध ठिकाणी अधिक प्रमाणात पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या ज्वारी, मका पिकांचे नुकसान झाले. जेथे कापूस फुटला होता, तो संततधार पावसाने पूर्णतः काळा पडला. यासोबतच अनेक पिकांचे नुकसान झाले. यामुळे शेतकरी नुकसानीच्या खाईत ओढला गेला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर व नंतरही पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वांचे नुकसान झाले. सात नोव्हेंबरला रात्री पुन्हा वादळी पावसाने जिल्ह्याला झोडपल्याने शेतीपिकांचे नुकसान आणखी वाढणार आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. 

तालुकानिहाय झालेले पंचनामे 
अमळनेर- 41 हजार 343 हेक्‍टर 
चोपडा- 58 हजार 865 
एरंडोल- 30 हजार 357 
धरणगाव- 22 हजार 108 
पारोळा- 44 हजार 683 
जळगाव- 41 हजार 395 
भुसावळ- 25 हजार 51 
बोदवड- 17 हजार 636 
यावल- 35 हजार 220 
रावेर- 25 जार 304 
मुक्ताईनगर- 28 हजार 736 
भडगाव- 32 हजार 77 
चाळीसगाव- 75 हजार 630 
जामनेर- 97 हजार 690 
पाचोरा- 40 हजार 958 
एकूण- 6 लाख 17 हजार 53 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com