जगाचा पोशिंदा नव्या आशेने रब्बीसाठी सज्ज 

farmer 3.jpg
farmer 3.jpg

नाशिक : अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेलीत. शेतीचे अतोनात नुकसान झाले. शेती धोक्‍यात आली, अशी भयानक अवस्था असतानाही शेतकरी पुन्हा एकदा नव्या आशेने रब्बीच्या हंगामासाठी सज्ज झाला आहे. खरीप हंगाम पाण्यात गेला, आता रब्बी तरी येईल, असा आशावाद असल्याने एका महिन्यातील सर्व दुःख बाजूला सारत शेतकरीवर्गाने रब्बीच्या हंगामाला सुरवात केली आहे. 

भरपूर पाण्यामुळे भाजीपाला, फळभाज्या घेण्यास शेतकऱ्यांची सुरवात 
रब्बीच्या हंगामातील पिके पेरणीच्या कामाला वेग आला आहे. गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे जमीन पडून असल्याने व जमिनीचा पोत टिकवून असल्याने यंदा पिके चांगलीच बहरली होती. हंगाम अंतिम टप्प्यात असताना व पीक पूर्ण परिपक्व झालेले असताना अचानक परतीच्या पावसाने गेल्या महिन्यात सरासरी चौदा दिवस मुक्काम केला आणि अचानक आलेल्या पाऊसरूपी संकटाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सोंगलेले धान्य जमिनीत सडले. शेतात उभे असलेले पीकही सडली. भाजीपाला आणि फळभाज्यांवर विविध रोगांनी थैमान घातले. खरीप हंगामातील जवळपास नव्वद टक्के नुकसान झाले. हे सर्व सहन करत शेतकरी पुन्हा एकदा रब्बीचे पिके शेतात उभी करण्यासाठी तयार झाला आहे. यंदा भरपूर पाणी असल्याने रब्बी हंगामातील पिके जोमदार होतील, अशी अपेक्षा आहे.  

गहू, हरभऱ्याला पसंती 
अनेक भागांत भौगोलिक रचनेनुसार खरीप हंगाम जोरात होत असला तरी रब्बी मात्र जोरदार होत नाही. यंदा प्रथमच रब्बी हंगाम जोरात सुरू झाला आहे. गहू, हरभरा, कांदे ही प्रमुख नगदी पिके घेतली जातात. यंदा पाऊस चांगला पडल्यामुळे रब्बीतही भाजीपाला, फळभाज्या घेण्यास शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. अवकाळी पावसाने उन्हाळ कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने कांद्यासाठी क्षेत्र पडिक ठेवण्यापेक्षा अनेक शेतकरी गहू, हरभरा या पिकांना पसंती देत आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com