कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

नांदगाव : तालुक्यातील जवळकी येथील काशिनाथ श्रावण गायकवाड (वय-50) या शेतकऱ्याने कपाशी पिकावरील फवारणीसाठीचे विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली.

दोन वर्षांपूर्वी बोलठाण येथील विविध कार्यकारी सोसायटीचे एक लाख चाळीस हजार रुपये कर्ज त्यांनी घेतले होते. त्याचे दोन वर्षांतील व्याजाची रक्कम 32 हजार 700 झाली. वडिलांच्या नावावर घेतलेले पीककर्ज हे कर्जमाफीच्या योजनेत माफ झालेले नव्हते. याबाबत काशिनाथ तणावाखाली वावरत होते. मंगळवारी सकाळी शेतात गेलेल्या काशिनाथ यांनी कपाशीवरील औषध घेतले. हा प्रकार लक्षात येताच काशिनाथ यांना उपचारांसाठी बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.

मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठविले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री उशीरा जवळकी गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com