28 पैकी 10 राज्यांची हीच स्थिती; फळांचे 7 लाख टनांनी कमी उत्पादन
नाशिक - देशात गेल्या वर्षी 2 कोटी 54 लाख 31 हजार हेक्टरवर 31 कोटी 17 लाख 14 हजार मेट्रिक टन फलोत्पादन झाले होते. यंदाच्या पहिल्या अंदाजानुसार 2 कोटी 58 लाख 72 हजार हेक्टरवर 31 कोटी 46 लाख 70 हजार टनांचे उत्पादन अपेक्षित असले, तरीही त्यात महाराष्ट्र पिछाडीवर आहे. 28 राज्यांपैकी इतर 10 राज्यांची ही स्थिती आहे. फळांचे उत्पादन 7 लाख टनाने कमी होण्याचा अंदाज आहे.
फळे, भाजीपाला, नारळ-ऑइल पाम-काजू-चहा-कॉफी-रबर-कोको (प्लॅन्टेशन), सुगंधी व औषधी वनस्पती, फुले, मसालेचे पदार्थ, मध याचा फलोत्पादनात समाविष्ट आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी 17 लाख 40 हजार हेक्टरवर दोन कोटी 48 लाखांहून अधिक टनाचे उत्पादन मिळाले होते. यंदाच्या पहिल्या अंदाजानुसार 16 लाख 43 हजार हेक्टरवर 2 कोटी 24 लाख टनाचे उत्पादन अपेक्षित आहे. फळे, भाजीपाला या क्षेत्रातील ही घसरण आहे. यंदा 6 लाख 98 हजार हेक्टरवर फळांचे 99 लाख 92 हजार टन फळांचे, तर 6 लाख 82 हजार हेक्टरवर 1 कोटी 16 लाख टन भाजीपाल्याचे उत्पादन अपेक्षित धरण्यात आले आहे.
फलोत्पादन क्षेत्रातील पिछाडीमध्ये आंध्र प्रदेश, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळ, मणिपूर, मिझोराम, ओडिशा, तेलंगणा, त्रिपुराचा समावेश आहे. देशामध्ये 65 लाख 32 हजार हेक्टरवर यंदा 9 कोटी 67 लाख टन फळांचे उत्पादन गृहीत धरण्यात आले आहे. तसेच भाजीपाल्याचे 1 कोटी 4 लाख 35 हजार हेक्टरवर 18 कोटी 74 लाख 74 हजार टन भाजीपाल्याचे उत्पादन अपेक्षित आहे. 2016-17 मध्ये देशात 2 कोटी 48 लाख 51 हजार हेक्टरवर फलोत्पादनाचे 30 कोटी 6 लाख 43 हजार टन उत्पादन मिळाले होते.
|