#BATTLE FOR NASHIK तरुणाईला शिक्षण, रोजगाराचा "आदित्य' वचननामा 

live
live


नाशिक ः रोजगार हा प्राधान्याचा विषय आहे, पण शिक्षणाच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदलाशिवाय रोजगार वाढविणे शक्‍य नाही. नाइट लाइफ भूमिकेमागे "हॉस्पिटॅलिटी' क्षेत्रातील रोजगार तिप्पट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे मुंबई लाइफ, पुणे लाइफसोबत नाशिक लाइफचा आता विचार करावा लागेल, अशा शब्दांत युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तरुणाईशी जिव्हाळ्याच्या विषयावर काम करण्याचा मानस व्यक्त केला. 
निमित्त होते आदित्य संवाद उपक्रमाचे. पक्षाचे बॅनर, स्टेज, भाषणबाजी फलक नाही. रॉक बॅंड, नाशिकचे ढोलपथक, स्टेजच्या चौफेर ज्याच्याशी संवाद साधायचा असा तरुणाईचा गराडा, फ्लड लाइटच्या प्रकाशात न्हाऊन निघालेले मैदान, पारंपरिक राजकीय पक्षांच्या मेळाव्यापेक्षा पूर्ण आगळीवेगळी रचना, जागोजागी नाश्‍ता आणि सेल्फी स्टॅण्ड अशा पूर्णतः वेगळ्या वातावरणात क्रांतिवीर व्ही. एन. नाईक संस्थेच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर आदित्य ठाकरे यांनी नाशिकच्या तरुणाईला महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या वाटणाऱ्या विषयावर बोलते केले. 

खासदारांनी पाच वर्षांत केले काय? 
श्री. आदित्य म्हणाले, की शिक्षण हेच अनेक प्रश्‍नांचे उत्तर आहे. अभ्यासक्रम बदलाची गरज आहे. भाजपसोबत वैचारिक मतभेद होते, लोकांच्या प्रश्‍नांवर भाजपसोबत (शिवसेना) आम्ही भांडलो. प्रश्‍नांची उत्तरे मिळाल्यावरच युती केली. ही युती देशासाठी आहे, भाजप किंवा शिवसेनेसाठी नाही. नाशिकच्या खासदारांनी टेलिमेडिसिन, रस्ते, इलेक्‍ट्रिक टेस्टिंग लॅब, राजधानी एक्‍स्प्रेस, उड्डाण योजनेचा पाठपुरावा, नेट न्यूट्रॅलिटी, क्रीडासंकुल अशी कामे केल्याचे सांगितले. आदिवासी भागात दर्जेदार खेळाडू आहेत. मात्र पुरेशा क्रीडा सुविधा नाहीत. त्याविषयी आधी शिक्षण, त्यासोबत क्रीडा सुविधा असे धोरण राहील. 
तत्पूर्वी बॅंड पथकाच्या गीतांचे, व ढोलपथकाचे सादरीकरण झाले. पावणेआठच्या सुमारास व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर सुमारे तासभर आदित्यने उपस्थित तरुणांच्या मनातील अपेक्षा, त्यांचे प्रश्‍न जाणून घेत तरुणाईशी थेट साधलेला संवाद असे स्वरूप असलेल्या प्रश्‍नोत्तर रूपात कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या तरुण खेळाडूंचा सत्कारही करण्यात आला. तसेच उपस्थितांना व्हिजिटिंग कार्डासोबत मोबाईल नंबर देऊन सूचना कळविण्याचे आवाहन केले. 


तरुणाईचे प्रश्‍न 

-पाच वर्षे टीका केली. मग निवडणुकीत युती का केली? 
-पाच वर्षे तुमच्या नाशिकच्या खासदारांनी केले काय? 
-मालेगावला औद्योगिक वसाहत आहे, उद्योग आणणार का? 
-पुणे विद्यापीठाच्या विभागीय केंद्राचा प्रश्‍न सुटणार कधी? 
-तुमचे महाराष्ट्राविषयीचे व्हिजन काय आहे? 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com