पहूरची केळी पोचली परदेशात 

live photo
live photo

पहूर (ता. जामनेर) : 'अपेक्षां पुढती गगण ढेंगणे' ही म्हण खरी करून दाखविली आहे. पहूरपेठ येथील तरूण शेतकरी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख यांनी. दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या पहूरमध्येच त्यांनी पाण्याच्या सुयोग्य व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण दर्जेदार केळीचे उत्पन्न घेतले. त्यांच्या केळीला सध्या अरब देशात चांगलीच मागणी होत आहे. 

जामनेर तालुक्यात दरवर्षी पर्जन्यमान घटत असल्याने शेतकऱ्यांना पाण्याच्या दुर्भिक्ष्याला सामोरे जावे लागत आहे. असे असताना केळीचे उत्पादन घेणे जोखमीचे काम आहे. ही जोखीम पत्करून श्री. देशमुख यांनी पाण्याच्या व्यवस्थापनातून दहा एकरात केळीचे उत्पादन घेतले. गुणवत्ता आणि दर्जेदार केळीला अफगाणिस्तान, इराण, युरोप या देशात निर्यात केली जात आहे. श्री.देशमुख हे गेल्या दहावर्षांपासून केळीचे उत्पादन घेत आहेत. सुरवातीला त्यांनी बऱ्हाणपूर, रावेर बोर्ड वर केळी विक्री केली. या वर्षी त्यांनी दहा एकरात पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून बेड पद्धतीने केळीची लागवड केली. त्यांना २६ ते २७ ची रास पडली. निर्यातप्रसंगी आठ ते नऊ फण्या घडाला ठेवल्या. केळीला दुध्या रंग आला असल्याचे त्यांनी सांगितले. 

पाच कंटेनरची निर्यात 
श्री.देशमुख यांच्या शेतातून सावदा येथील केळीचे व्यापारी हितेंद्र नारंग यांच्या माध्यमातून पाच कंटेनर ११० टन केळी माल अफगाणिस्तान, इराण व युरोप या देशात निर्यात करण्यात आला आहे. जवळपास १९ लाख ८० हजार किंमतीचे उत्पादन झाले असून केळी मालाच्या गुणवत्तेमुळे उच्च प्रतीचा भाव मिळाला आहे. तसेच बाजारातील तेजी-मंदीतही भाव समाधानकारक मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. 

निर्यातीपूर्वी प्रिकुल्ड प्रक्रिया 
नाशिक, पिंपळगाव येथे केळी मालावर प्रिकुल्ड प्रक्रिया करून मुंबई येथे माल पाठविण्यात येतो. तेथील बंदरावरून माल अफगाणिस्तान, युरोप व इराण येथे पाठविण्यात येतो. असे केळी व्यापारी हितेंद्र नारंग यांनी सांगितले. 

दहा एकरात बेड पद्धतीने केळीची लागवड केली आहे. निचरा पद्धतीने पाणी दिल्याने पाण्याचा ओलावा टिकून राहिला. त्यामुळे केळीचे गुणवत्तापूर्ण उत्पादन काढले. यासाठी शेण खताचा जास्तीत जास्त वापर करण्यात आला असून रासायनिक खताचा अल्प प्रमाणात वापर केला आहे. मालाची गुणवत्ता चांगली असल्याने मंदीतही उच्च प्रतीचा भाव मिळाला असून परदेशात केळीची निर्यात केली आहे. 
- संजय देशमुख प्रगतीशील शेतकरी तथा सभापती बाजार समिती, जामनेर 
 
जगात सर्वाधिक केळी उत्पादन भारतात असून यात जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. गुणवत्ता वाढीसाठी शेतकऱ्यांना शासनाने प्रशिक्षण द्यावे, असे केल्यास गुणवत्ता सुधारून परदेशात केळीची निर्यात वाढेल. शेतकऱ्यांना वाजवी भावही मिळेल. 
- हितेंद्र नारंग केळी व्यापारी, सावदा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com