
जळगाव : जळगाव जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी आहे. मार्चपासून जे नागरिक परदेशातून आले होते, त्यांचा तपशिल जिल्हा प्रशासनाच्या हाती लागला आहे. जे नागरिक कोरोनोचे संशयित होते, त्यांना घरीच क्वारंटाईन राहण्यास सांगितले होते. त्यांचा 14 दिवसांचा संकटग्रस्त कालावधी संपला आहे. यामुळे परदेशातून आलेल्यांमुळे जिल्ह्यात आता इतरांना संसर्ग होण्याची संभावना तूर्त तरी नसल्याची स्थिती आहे.
जिल्ह्यात परदेशातून किती लोक आले, त्यांना कोरोना झाला असेल का? ते कोठे असतील आपल्याला त्यांच्यापासून धोका आहे ? अशी भिती जिल्हातील नागरिकांना होती. मात्र आता या भितीची गरज नाही. जे परेदशातून आले त्यांचा शोध जिल्हा प्रशासनाने घेऊन त्यांना क्वारंटाईन केले आहे. त्यांचा 14 दिवसांचा संकटग्रस्त (कोरोनोचे) कालावधीही संपला आहे.
23 मार्चला जनता लॉकडाऊन नंतर भारतभर लॉकडाऊन झाला. जे नागरिक परदेशातून जळगाव जिल्हयात आले होते. त्याचा शोध घेण्यास जिल्हा प्रशासनाला राज्य शासनाने सांगितले होते. विदेशातून आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची स्क्रीनींग करून, ते कोठेकोठे गेले याबाबतची माहिती घेण्यास सांगितली होती. त्यासाठी अंगणवाडीसेविका, इतर विभागाचे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तहसिलदार, प्रांताधिकारी, तलाठी, मंडळाधिकाऱ्यांनाही दक्षतेचे आदेश देत बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची माहिती तात्काळ जिल्हा प्रशासनास देण्यास सांगितली होती. समन्वय अधिकारी म्हणून महापालिका क्षेत्रासाठी लेखाधिकारी कपिल पवार, ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
अशी आहे वस्तुस्थिती
जिल्ह्यात एक मार्चपासून ग्रामीण भागात 220 तर महापालिका हद्दीत 86 नागरिक असे परदेशातून एकूण 306 नागरिक आले. त्यातील 2 जणांना कोरोनोची बाधा झाला. त्यातील एकाचा मृत्यू झाला. जे विदेशातून आले होते अशा नागरिकांच्या संपर्कात 259 नागरिक आले. त्यातील ग्रामीण भागात 92 तर महापालिका हद्दीत 167 नागरिकांचा समावेश आहे. या 259 नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेने योग्य ठिकाणी क्वारंटाईन केले होते. या नागरिकांचा आता हा क्वारंटाईनचा कालावधीही (14 दिवसांचा) संपला आहे, अशी माहिती
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी दिली. हे नागरिक आता सर्वसामान्यासारखे व्यवहार करू शकतात. यामुळे जिल्ह्यात आता परदेशातून आलेल्या नागरिक, त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांपासून कोरोना संसर्ग होण्याचा धोक्याची शक्यता नाही.
"निजामुद्दीन'मधील 49 जणांचा शोध
निजोमुद्दीन येथून जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 50 नागरिक आले आहेत. त्यात 1 एप्रिलला 13, 3 ला 31 व 5 एप्रिलला 6 अशा एकूण 50 जणांचा त्यात सामावेश आहे. त्यातील 49 जणांचा शोध जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यांनाही कोरोंटाईन करण्यात आले आहे. एकाचा शोध घेतला जात आहे. यापैकी 24 जणांना क्वारंटाईन केले आहे. 6 व्यक्ती महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यात आल्या आहेत, तर 19 जण राज्याबाहेरील प्रांतातून जळगावी दाखल झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.