वाघूर धरण शंभर टक्के भरले 

वाघूर धरण शंभर टक्के भरले 

जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे गिरणा धरण 100 टक्के भरले. त्यापाठोपाठ आता वाघूर धरणही शंभर टक्के भरल्याने भुसावळ, जामनेर तालुक्‍यातील पाणीटंचाई मिटण्यास मदत होणार आहे. वाघूर धरण पाचव्यांदा शंभर टक्के भरले आहे. वाघूर धरण जळगाववासीयांसाठी महत्त्वाचे आहे. हे धरण भरल्याने जळगावचा पाणीप्रश्‍न आता दोन वर्षांसाठी मिटला आहे. 

गेल्या उन्हाळ्यात जळगावकरांना चार ते सहा दिवसांआड पाणी मिळत होते. अनेक ठिकाणी पाणीटंचाई होती. यंदाचा उन्हाळा जळगावकरांसाठी पाण्याबाबत खडतर गेला. आगामी उन्हाळ्यात मात्र जळगावकरांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे. वाघूर धरणात दोन वर्ष पुरेल एवढे पाणी त्यात आहे. 
जिल्ह्यात आजअखेर पर्यंत 111.6 टक्के पाऊस झाला आहे. पावसाची एकूण सरासरी 663.2 मिलिमीटर आहे. आतापर्यंत 740.4 मिलिमीटर पाऊस झाला आहे. अजूनही पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे पावसाची टक्केवारी 125 टक्‍क्‍यांपर्यंत पोचण्याची चिन्हे आहेत. 

"वाघूर'चे चार दरवाजे उघडले 
हतनूर धरणात 59.61 टक्के पाणीसाठा आहे. या धरणाचे 8 दरवाजे पूर्ण उघडले आहेत. गिरणा धरण शंभर टक्के भरले आहे. आता वाघूर धरणही शंभर टक्के भरल्याने जामनेर परिसरातील पाण्याचा प्रश्‍न मिटल्यात जमा आहे. वाघूर धरणाचे चार दरवाजे साडेपाच मीटरने उघडण्यात आले आहे. यामुळे वाघूर नदीही आता दुथडी भरून वाहू लागली आहे. 

वाघूर धरण...क्षमता व आजची स्थिती 
पाणी क्षमता--248.55 दलघमी 
टीएमसी---8.78 
पाणीपातळी--234.10 मीटर 
टक्केवारी--100 टक्के 

2018 ची स्थिती 
पाणी क्षमता--117.41 दलघमी. 
टीएमसी---4.15 
पाणी पातळी--229.75 
टक्केवारी--47.24 टक्के 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com