नाशिक- स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये ग्राहकांना नेहमी ताटकळत थांबावे लागते, बसण्यासाठी पुरेशी जागा नसते, एटीएम असुरक्षित असतात... अशा एक नव्हे अनेक तक्रारींचा पाढा काल ग्राहकांनी ग्राहक मेळाव्यात वाचला. दरम्यान, 42 कोटी ग्राहकसंख्या असलेल्या या सर्वांत मोठ्या बॅंकेचे ग्राहकच आमचे सर्वेसर्वा असून, त्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता पडू नये, हाच आमचा प्रयत्न असल्याचे आश्वासन बॅंकेचे मुख्य महाप्रबंधक जी. रवींद्रनाथ यांनी दिले.
स्टेट बॅंकेतर्फे कुसुमाग्रज स्मारकात ग्राहक मेळावा घेण्यात आला. त्यात ग्राहकांनी बॅंकेचे कौटुंबिक सदस्य या नात्याने आपल्या सूचना करण्याचे आवाहन बॅंकेने केले होते. त्या वेळी उपस्थित ग्राहकांनी कर्मचारी वर्गाच्या सौहार्दपूर्ण सेवेचे कौतुक करतानाच अजूनही ग्राहक सेवेत सुधारणा करण्यास बराच वाव असल्याचे निदर्शनास आणून दिले. बॅंकेचे मुख्य महाप्रबंधक जी. रवींद्रनाथ, महाप्रबंधक संजीवकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळवा झाला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.