मुक्ताईनगर, (जि. जळगाव) - वीज वितरण कंपनीने शेतातील वीज जोडणी खंडित केल्यामुळे पाणीपुरवठ्याअभावी पिकाचे नुकसान होईल, या नैराश्यातून 55 वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी कर्की (ता. मुक्ताईनगर) येथे उघडकीस आली. कर्की येथील शेतकरी अशोक लक्ष्मण पाटील यांची गावाजवळ शेती आहे.
त्यांच्यावर सेंट्रल बॅंकेचे सात लाख रुपये कर्ज, तसेच कृषिपंपाच्या विजेची दोन लाखांपर्यंत थकबाकी होती. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांआधीच त्यांचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे पिकांना आता पाणी कसे द्यायचे, या विवंचनेत ते होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची गावात चर्चा सर्वत्र होती.
|