Nandurbar Lok Sabha Election : सामान्य कार्यकर्त्यांची डिमांड वाढली!

Nandurbar News : निवडणुक आली म्हणजे ग्रामीण असो की शहरी भागातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचीही पक्षीय पदाधिकारी व नेत्यांना आठवण येते. तसेच चित्र सध्या नंदुरबार लोकसभा मतदार संघाच दिसून येत आहे.
Nandurbar Lok Sabha Election
Nandurbar Lok Sabha Electionesakal

Nandurbar News : निवडणुक आली म्हणजे ग्रामीण असो की शहरी भागातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचीही पक्षीय पदाधिकारी व नेत्यांना आठवण येते. तसेच चित्र सध्या नंदुरबार लोकसभा मतदार संघाच दिसून येत आहे. शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचाही शोध घेत त्यांना मान -सन्मानाने बोलावून निवडणुकीचा कामाला लागण्याची विनंती केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणुकपुरती का होईना डिमांड (वजन) वाढले आहे. (Nandurbar Lok Sabha Election)

निवडणुक कोणतीही असो, एक एक मतदार व मतदान महत्वाचा असते, त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना व उमेदवारांना आपलाच उमेदवार विजयी झाला पाहिजे, असे वाटते. त्यासाठी मतदारांची गोळाबेरीज केली जाते. ही सर्व गोळाबेरीज करतांना मतदारसंघात प्रत्येक गाव -पाड्यात नेते किंवा उमेदवार पोहचू शकत नाहीत हे तेवढेच सत्य आहे.

मात्र त्यांचे दूत म्हणून काम करतात ते सर्वसामान्य कार्यकर्ते असतात. हा सर्वसामान्य कार्यकर्ता पाच वर्ष कुठे होता, काय करत होता, काय खात होता, याच्याशी कोणत्याही पक्षाचा नेत्यांना अथवा उमेदवारांना देणे- घेणे नाही. मात्र निवडणूक आली रे आली. एक एक कार्यकर्ता महत्वाचा ठरतो, तसेच चित्र सध्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातही दिसून येत आहे.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र येथे मुख्य लढत असलेले व मुख्य उमेदवारांची नावे घोषित झाली आहेत. त्यामुळे या भाजप कॉंग्रेस दोन्ही पक्षांकडून शहरातील वार्ड, प्रभागासह ग्रामीण भागातील गाव-पाड्यांवर उमेदवार व त्यांच्या पक्षाचा पदाधिकारी भेटी देऊन आपला अप्रत्यक्ष प्रचार करीत आहेत. (latest marathi news)

Nandurbar Lok Sabha Election
Nandurbar Loksabha Election : नंदुरबार लोकसभा निवडणूक जिंकणारच; काँग्रेसचे माजी मंत्री वसंत पुरके यांचा दावा

सध्या प्रचाराला वेग नसला तरी दोन्ही गटाकडून आपला उमेदवार कसा प्रबळ आहे. त्यांनी या पूर्वी काय केले आहे, पुढे काय करण्याचा संकल्प आहे हे पटवून दिले जात आहे. त्यासाठी गावात फिरतांना त्या गावातील नागरिक आपल्या मागे फिरावेत, गर्दी दिसावी, त्यातून शक्ती प्रदर्शन आपसूकच होईल.

या इराद्याने राजकीय मंडळी आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जवळ बोलावून त्यांचाशी संवाद साधतांना दिसत आहेत. ज्या गावांना भेटी देण्यासाठी जाणार आहेत. त्यापूर्वी तेथील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचीही आठवण करून मान-सन्मान देत बंगल्यावर अथवा कार्यालयात बोलावून अत्यंत आस्थेवाईकपणे विचारणा करीत आपलेसे केले जात आहे.

त्यानंतर हळूच निवडणूकीच्या कामाला लागा, काही अडचण असेल तर सांगा, असे सांगत निवडणुकीची जबाबदारी सोपविली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ताही गावात मोठ्या ऐटीत मिरतांना दिसू लागले आहेत. गल्ली बोळात, घोळक्यात मोठ्या उत्साहाने सांगू लागले आहेत. साहेबांनी बोलवले होते.

कामाला लागायला सांगितले. त्यामुळे हे कार्यकर्ते आपआपल्या पक्षाचा व उमेदवाराचा झेंडा घेऊन गावभर हिंडू लागले आहेत. यावरुन लोकसभा निवडणुकीमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही डिमांड आल्याचे चित्र दिसून येत आहे.

Nandurbar Lok Sabha Election
Loksabha Election : निवडणुकीमुळे कोट्यवधीचे चलन बाजारात; भाजप, काँग्रेस आघाडीवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com