Deepika Chavan
sakal
सटाणा - ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली निवडणुकीपूर्वी महिलांना आश्वासनांची खैरात वाटणारे आणि निवडणुकीनंतर त्याच महिलांना अपात्र ठरवत योजनेबाहेर ढकलणारे भाजपा महायुती सरकार आता उघडे पडले आहे, असा संतापजनक आरोप करत निवडणुकीत गाजावाजा करून मते मिळवायची आणि निवडणूक संपताच लाखो महिलांना अपात्र ठरवून त्यांना बाहेर काढायचं, हा सरळसरळ विश्वासघात असून महिलांच्या मतांची राजकीय लूट आहे, अशी टिका करताना माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या दीपिका चव्हाण यांनी थेट सरकारला जाब विचारला आहे.