नाशिक: आंबे (ता. पेठ) ग्रामपंचायतीच्या कामातील भ्रष्टाचार प्रकरणी ग्रामसेवक व सरपंच यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देत ग्रामपंचायत विभागाने किरकोळ कारवाई केली. अखेर राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्वतः विभागप्रमुखांना दूरध्वनी करून त्यांना खडेबोल सुनावले. ‘काम करणे शक्य नसेल तर लोकांना खोटी आश्वासने देऊ नका,’ अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.