Water Crisis : नांदगावला कृत्रिम पाणी टंचाई; 22 दिवसापासून 17 गावांचा पाणी पुरवठा ठप्प

Water Crisis
Water Crisisesakal

नांदगाव : बावीस दिवसापासून ५६ खेडी नळपाणी पुरवठा योजना विस्कळित असताना सोमवारी (ता. २७) उद्भव विहिरीवरील उपसा करणाऱ्या तीनपैकी दोन पंप नादुरुस्त झाल्याने शहरासह लगतच्या सतरा गावांचा पाणी पुरवठा ठप्प झाला.

नादुरुस्त झालेले व्हीटी पंप दुरुस्तीसाठी वेळ लागणार असल्याने ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची मात्र कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थ विशेषतः गृहिणी वर्ग संतप्त झाला आहे.

Water Crisis
Drinking Water Crisis : 24 तासाचे सोडा, सिन्नरला 4 दिवसाआडही पाणी नाही

पिण्याच्या पाण्याची वितरण व्यवस्था कोलमडून पडल्यानंतर देखील देखभाल दुरुस्ती करणाऱ्या योजनेच्या अभियंत्यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला.

बावीस दिवसापूर्वी सुरवातीला कळमदरी जवळ न्यू पांझणच्या जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. ती दुरुस्त करण्यात आली. त्यानंतर वडाळकर वस्तीच्या परिसरात पुन्हा एकदा मुख्य जलवाहिनी फुटली.

ती दुरुस्त होत नाही तोच स्मशानभूमी जवळ पुन्हा जलवाहिनी फुटली. या सगळ्या गळत्यांमुळे अक्षरशः लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली.

Water Crisis
Hinjewadi Water Issue : आयटीत घर घेताय? सावधान..!! पाणी देता का पाणी असे म्हणण्याची वेळ येऊ शकते?

पिण्याच्या पाण्याचा आवर्तन कालावधी देखील लांबत गेला त्यातच सोमवारी (ता.२७) दुपारी गिरणा धरणावरील योजनेसाठी पाण्याचा उपसा करणाऱ्या तीन पंप पैकी दोन बंद पडले. त्यामुळे एका पंपावर उपसा करावा लागत आहे.

यामुळे धरणाच्या उद्भव विहिरीपासून न्यू पांझणच्या जलशुद्धीकरण केंद्रापावेतो कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. परिणामी या ठिकाणापासून ते येवला रस्त्यावरील मुख्य जलकुंभापर्यत पाणी पोचत नसल्याने देखभाल दुरुस्तीच्या पथकातील कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.

Water Crisis
Drinking Water : आता पाणीही जपून प्या ! नाहीतर असे होतील दुष्परिणाम

सध्या उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत अशातच कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होऊन पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. विशेष म्हणजे योजनेतील मुख्य जलवाहिन्या वारंवार फुटू लागल्याने त्याच्या गळत्या दुरुस्तीला यश येत नाही तोच पुन्हा गळती होत असल्याने भूजलाची पातळी खालावल्याने ग्रामीण भागातील विहिरी हातपंप यासारखे पर्यायी जलस्रोत बंद पडत आहे. शाश्‍वत पर्याय समजली जाणारी योजना विस्कळित झाल्याने कृत्रिम पाण्याचे संकट अधिक गडद झाले आहे.

Water Crisis
Copper Water Drinking: उन्हाळ्यातही तांब्याचे पाणी पिणे योग्य आहे का?

लाखोचा खर्च पाण्यात

जुनाट झालेल्या जलवाहिन्या,क्षमता कमी झालेली यंत्रसामग्री यामुळे योजनेला कालबाह्य ठरवीत त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे लाखो रुपये खर्ची होत असताना देखील वाहिनी सातत्याने फुटत आहे.

धरणाच्या उद्भव विहिरीवर १८० अश्वशक्तीचे तीन पंप असून अनेकदा त्यांच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. काही वेळा नवे व्हीटी पंप बसविण्यात आले तरीही सलग उपशामुळे तेही खराब झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com