लग्नात नवरीचे पाहुण्यांना भन्नाट गिफ्ट, मित्रपरिवारांनी ठोकला सलाम!

nashik wedding
nashik weddingesakal

नाशिक रोड : नाशिकमध्ये झालेल्या एका अनोख्या विवाह सोहळ्याची (wedding ceremony) चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे. लग्नात काहीतरी आगळेवेगळे करू, अशी नवरीची (bride) संकल्पना होती. त्यानुसार तिने केलेल्या कार्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. असं काय केलं नवरीने???

अनोख्या विवाह सोहळ्याची सोशल मीडियावर चर्चा

नाशिक रोड येथील राजराजेश्‍वरी मंगल कार्यालयात बुधवारी (ता. ७) झालेल्या एका अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे. महिलांच्या मासिक पाळीविषयी समाजात खुलेपणाने चर्चा होत नाही. मात्र, महिलांमध्ये स्वच्छतेचा जागर व्हावा आणि आपल्या विवाहामध्ये शासनाच्या स्वच्छता कार्यक्रमाला हातभार लागावा, या उद्देशाने जातेगाव येथील नववधू स्वाती दिघोळे हिने स्वतःच्या विवाह समारंभात महिलांना भेटवस्तू म्हणून चक्क सॅनिटरी नॅपकिन वाटले.

नवरीला ठोकला सलाम!

नववधू स्वातीचे शिक्षण बी. टेक.पर्यंत झालेले आहे. महिलांनी मासिक पाळीविषयी जनजागृती करावी आणि स्वच्छतेविषयी समाजात मोकळेपणाने संवाद साधावा, हा या उपक्रमामागचा हेतू आहे. या उपक्रमाला अभियंता असलेले पती अक्षय पानसरे यांनीदेखील मोलाची साथ दिली. म्हणूनच या विवाहाची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे सांगण्यात आले. लग्नाला उपस्थित वऱ्हाडी मंडळींसह पाहुणे, आप्तेष्ट व मित्रपरिवारांनीही या अनोख्या भेटवस्तूचा सन्मानाने स्वीकार करत स्वातीला सलाम ठोकला आहे.

या सोहळ्यात स्वतः उद्योजक असलेल्या नववधूने महिलांना भेटवस्तू म्हणून सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले.या सोहळ्यात स्वतः उद्योजक असलेल्या नववधूने महिलांना भेटवस्तू म्हणून सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले.

nashik wedding
'RBI'चं पतधोरण जाहीर, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे निर्णय

समाजात मासिक पाळीविषयी जनजागृती

लग्नात काहीतरी आगळेवेगळे करू, अशी संकल्पना होती. माझा स्वत:चा सॅनिटरी नॅपकिन निर्मितीचा व्यवसाय आहे. त्यामुळे महिलांनी मोकळेपणाने समाजात मासिक पाळीविषयी जनजागृती करावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविला. यात पती अक्षय पानसरे यांनीही मोलाची साथ दिली. -स्वाती दिघोळे, नववधू

महिलांनी समाजात जनजागृती म्हणून मासिक पाळीवर मोकळेपणाने बोलायला हवे. स्वच्छतेविषयी स्वातीने राबविलेला हा उपक्रम इतर विवाह सोहळ्यांतही राबविला गेला पाहिजे. त्यातून समाजात मोकळेपणाने जनजागृती होऊन स्वच्छतेचा जागर होईल. -रंजना शिंदे, वऱ्हाडी

nashik wedding
कलम ३७० रद्द झाल्यापासून जवानांचे मृत्यू कमी, पण नागरिकांचे जास्त

विवाह समारंभात स्वच्छतेचा जागर करण्यासाठी हा अनोखा प्रयत्न स्वातीने केला. मासिक पाळीविषयी जनजागृती व्हायला पाहिजे, हा यामागचा उद्देश असून, समाजात मोकळेपणाने या विषयावर महिलांनी आणि पुरुषांनीही संवाद साधायला हवा, हा त्यामागचा हेतू आहे. -अक्षय पानसरे, वर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com