CM Eknath Shinde | उल्हासनगरच्या धर्तीवर गोदावरीत हर्बल फवारणी : मुख्यमंत्री शिंदे

CM Eknath Shinde News
CM Eknath Shinde NewsEsakal

चांदोरी (जि. नाशिक) : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात सांडपाणी तसेच, येथील औद्योगिक वसाहतीतील केमिकलयुक्त पाणी मिसळत असल्याने नदीपात्रात दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे.

गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविण्यासह औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याबाबत शासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी निफाडचे आमदार दिलिप बनकर यांनी सभागृहात लक्षवेधीद्वारे केली.

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोदावरी नदीपात्रातील पानवेलींची कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्यासाठी नदीपात्रात तत्काळ उल्हासनगरच्या धर्तीवर हर्बल फवारणी करण्याच्या सूचना नाशिक महापालिकेसह जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. (CM Shinde statement Herbal spraying in Godavari on lines of Ulhasnagar nashik News)

‘सकाळ’मध्ये प्रकाशित झालेले वृत्त
‘सकाळ’मध्ये प्रकाशित झालेले वृत्तesakal

गोदावरी प्रदूषणाबाबत ‘सकाळ’मध्ये २८ फेब्रुवारीला ‘पानवेलींसदर्भात शासनाची चालढकल’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत श्री. बनकर म्हणाले, गोदावरी प्रदूषणामुळे नदीत घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले असून, मोठ्या प्रमाणात पानवेली पसरत आहेत.

त्याचा परिणाम निफाड तालुक्यात गोदापात्रालगतच्या चाटोरी, सायखेडा, चांदोरी, गोंडेगाव, शिंगवे, करंजगाव, चापडगाव, कोठुरे, मांजरगाव आदी गावांतील नळपाणी पुरवठा योजनांवर होत आहे.

नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होत असल्याने अनेक साथीच्या रोगांना बळी पडावे लागत आहे. गोदावरी नदीतील जलपर्णी काढण्यासह प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेसह सबंधित विभागाकडे सातत्याने तक्रार करूनही प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही केली जात नाही.

शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने गोदावरी काठालगत असलेल्या नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झालेली आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

CM Eknath Shinde News
Republic Day Chitrarath : शक्तिपिठांच्या चित्ररथाची वणी गावात शोभायात्रा!

ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या उल्हास नदीतून पाच मोठ्या महापालिका पाणी उचलतात. या नदीपात्रात नेरळच्या सगुणा फाउंडेशनच्या माध्यमातून ड्रोनच्या सहाय्याने पानवेलींवर औषध फवारणी केली जात होती.

त्यामुळे तेथील पानवेली हळूहळू नाहीशा होऊन पात्र पानवेलींमुक्त झाले. पानवेली निर्मूलनासाठी नदीत एक रसायन फवारण्यात आले. देशातील काही नद्यांमध्ये हा प्रयोग करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

या प्रयोगामुळे साधारणपणे ३ वर्षे पानवेलींची वाढ होत नाही. हाच प्रयोग नाशिकच्या गोदावरी नदीपात्रातील जलपर्णीचा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी करावा. नाशिक महापालिकेसह नदीच्या हद्दीतील ज्या कंपन्या आपले दूषित पाणी नदीपात्रात सोडतात अशा कंपन्यांवर व महापालिकेवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार बनकर यांनी केली.

CM Eknath Shinde News
Unseasonal Rain: अवकाळी, गारपिटीमुळे पिकांचे नुकसान; कांद्याला प्रादुर्भावाची शक्यता, पीक झाकण्यासाठी धावपळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com